मराठीमाणूस.नेट ! Marathimanus.net !

मराठी आमची मायबोली ! मराठी मन जोड़णारी !
मुख्य पान
भारत माझा देश
राष्ट्रगीत
ओळखीचे चेहरे
आध्यात्मिक
लेखणीतून
मराठी साइट्स
आरोग्य
मराठी गाणी (विडियो)
किलबिल
बाल रंजन
सम्पर्क करा
मराठी चित्रपट
 लेखणीतून
कविता

शब्दाला शब्द जोडले की झाली कविता
वाक्याला वाक्य भिड़ले की झाली कविता
मनाशी मन जूळले की झाली कविता
आकाशी रंग उधळले की झाली कविता
मनाताल्या भावना व्यक्त केल्या की झाली कविता
शेवटी काय...
कवि मनाला जागें केले की झाली कविता
चारोळी
पडलेली फूले वेचता वेचता
पाने गलायाला लागली
आपली माणसे जोड़ता जोड़ता
परकीच आपली वाटायला लागली
 
श्रावण
श्रावणाचा खेळ चालला
उन्हा मागे पाउस चालला
मेघांचा रंग दाटला
श्रावणाचा खेळ चालला
गवताच्या हिरव्या गालिच्यावर
हिरवा हिरवा मोर डोलला
श्रावणाचा खेळ चालला
सणाचा रंग उधळला
पानांचा ही रंग बदलला
मित्र मैत्रिनिंचा मेंळ जाहला
श्रावणाचा खेळ चालला
 
गाणी
मनातली ही गोड गाणी
मंगल गाaणी दंगल गाणी
ओठावर गुण गुणारी सहज गाणी
प्रेमळ आजी ने रचलेली ही बाल गाणी
हसर्या चिमुकल्या पाखरांची गाणी
हत्ती कासव सश्याची गाणी
निरागस चेहह्याच्या त्या तान्ह्यांची गाणी
मंगल गाणी दंगल गाणी
बोबद्या बोलातली गोड गाणी
कधी न विसरणारी ही अमूल्य गाणी

पतंग
आकाशी भरारी मारते पतंग
उंच उडायला शिकाविते पतंग
कागदाचे विविध आकार दर्शविते पतंग
उडवणार्याची मान उंचाविते पतंग
दोर ढीला सोडताच भरकटते पतंग
जिवनाचे हे मुल्य दर्शविते पतंग
उँची गाठता स्थिरवते पतंग
विचारी पुरुषाची खोली सांगते पतंग
नभी जाताच लहानाच्या ओठावर हास्य देते पतंग
मोठ्यानाही लहान करून जाते पतंग

जाळे
मला पाह्ताच ती खुद्कन हसली
मी मनात म्हटले पोरगी जाळ्यात फसली
मी तिला लग्नाची मागणी घालताच ती शरामली
मला काय माहित होते माझीच कुर्हाड माझ्याच पायी बसली
लग्नानंतर सप्तपदिची अनेकदा आठवण येते
सत्यवानाचे काय झाले असेल हा विचार करून त्याची मात्र कीव येते
लग्नाचा लाडू खावून बघावा असे मोठे म्हणतात
त्यांच्या बत्तिशिचे बोळके, डॉक्यावरचे टक्कल बर्याच गोशती सांगून जातात
म्हणून लग्नाचे आमिष कोणाला दाखावू नये
आपण ज्या खद्दयात पडलो त्यात दुस्र्यास पाडू नये
 
जिद्द
दूबळ्या हाता पायात शक्ति कुठून येते
इवल्याश्या पंखाना एवढी मोठी भारारी कशी मारता येते
प्रयत्न आपल्यापरिने सर्वजण करतात
मग यशाचे शिखर काही मोजकेच का गाठतात
परभावाने कच खावुन काही मागे फिरतात
पराभव ही यशाची पहिली पायरी आहे असे मग लोक का सांगतात
इच्छित मिलाले नाही म्हणून भाग्याला दोष कोणी देतात
तर कोणी आपल्या हक्काचे इच्छित मिळवून घेतात
मनाने ठरवल्यास अशक्य काही नाही
मनात जिद्द असल्यास परमेश्वर ही दूर नाही
 
नवीन वर्ष
नवीन सालाची चाहुल लागताच मन मोहरून जाते
नवीन स्वप्नांची चाहुल लागताच मन बहरून येते
नवीन सालाच्या स्वप्नात रंगताना मन गहिवरून येते
हेच नवीन वर्ष दर वेळी नवीन बनून येते
 
निसर्ग
निसर्ग आपल्याला नेहमीच काहीतरी सांगत असतो
आयुष्य कसे जगावे हे आपल्याला नेहमीच शिकवित असतो
डोळे उघडे ठेवून आपण बघितले तर आपणास कलेल
आपण त्याच्याकडून किती आत्मसात करू शकतो
सूर्य प्रकाश देतांना, नदी पाणी देतांना, वारा शीतलता देतांना विचार करीत नाही
मग गरिबाला एक रूपया देतांना आपले मन आपणास का मागे खेचते ?
रुतु मागुन रुतु बदलतात तरी निसर्ग कधी तक्रार करतांना दिसत नाही
मग छोटीशी गोष्ट मनाविरुद्ध झाली की आपली का तगमग होते?
निसर्गाला सगलेच सारखे असतात
मग आपणच का आपल्यात भेदभाव करतो ?
डोळ्या समोरचा गुरु आपणास दिसत नाही
म्हणुनच नाही का आपण सदैव भटकत असतो ?
 
 
दिशा
कुठे चाललाय माणुस, का इतका बदललाय
पुढे जाता जाता बालपणीच्या सवंगड़यालाच विसरलाय
कधी विचार केलात असे का घडतय?
सर्व सूखे असुनही जीवन का कुढतय ?
उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणुस नेहमी बाहेरच करत असतो
उत्तर सापडणार नाही हे त्यालाही माहिती नसतं
मग, तरीही का..
तरीही का स्वतःला एवढं पुढे न्यायचं की छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणी मोठ्या सुखाच्या अनुपस्थितिने दुखी व्हायचं ?
कुठे नेणार आपल्याला हे आपले विचार आणि ही विचारसरणी
फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या चिमुकल्या साथीदारांना...
आपल्यालाच कळत नाही आपण कुठे जातोय
तर त्यांना कसा मार्ग दाखवणार ?
चला आपण एक छोटासा प्रयत्न करू, आपण स्वतःशीच प्रामाणिक राहू
आणि एकमेकांना जोडून आपलेसे करू !

 
 
विचार कर

अरे मानवा विचार कर
इथे का आला आहेस ह्याचा विचार कर
इथे काय करतो आहेस ह्याचा विचार कर
पैसा की प्रेम काय मोठे आहे ह्याचा विचार कर
सुख की समाधान काय हवे आहे ह्याचा विचार कर
आपली माणसे की एकांत काय हवेसे वाटते ह्याचा विचार कर
भक्ति की चैन कोण बरोबर मार्ग दाखवते ह्याचा विचार कर
मानवा एक क्षण कधी तरी विसावा घे आणि विचार कर
 
 
 
शहर
शहरातील लोग का पळतात कळतच नाही
दिवस रात्र कश्याच्या मागे धावतात उमजत नाही
गाडी मागुन गाडी बस मागुन बस
असे म्हणावेसे वाटते अरे माणसा कधीतरी आरामात बस
माणसांच्या गर्दीत तरी सगळे एकटेच वाटतात
सगल्यांच्या नजारा नेहमीच कुणालातरी शोधत असतात
असे हे किती दिवस चालणार हे कुणाला कळत नाही
आयुष्य सम्पल्या शिवाय हे
सत्य कुणाला उमगत नाही

फ़ोन
खणाणून वाजला तो पाहतो तो टेबलवरचा कोण ?
पाहतो तर काय हा तर आपला नेहमीचा फ़ोन
गप्पा टप्पा हर्षा उन्माद सर्वच अईकतो तो कोण?
तुम्हाला लक्षात आले असेलच की तो हाच फ़ोन
किती ही दूर असलो तरी जवळ आणतो कोण?
अहो काय एवढे सुद्धा माहिती नाही की हा आहे फ़ोन
रिसीवर डायल आणि वायर यांनी बनतो असा तो कोण ?
बरोबर ओळखले आपला जिवलग आपला लाडका फ़ोन

पिंजरा
मनात दडलेल्या भावनांचा पिंजरा
मनात कुढ़लेल्या भावनांचा पिंजरा
अपुरया असलेल्या इछांचा पिंजरा
झालेल्या परभावाचा पिंजरा
महात्वाकांक्षा पूर्या न होण्याचा पिंजरा
आयुष्याच्या कर्ताव्यांचा पिंजरा
आयुष्य हातुन निघून गेल्याचा पिंजरा
सर्वकाही मिळवुन गमावल्याचा पिंजरा

श्रावण
पाने फूले कळ्या आपसात बोलू लागल्या
हा निसर्गाचा खेळ पाहून तो सुर्यही हसू लागला
श्रावनणातल्या माती चा सुगंध हलकेच दरवलू लागला
मैन्त्रीणीच्या गप्पा गोष्टी त्यात रंगु लागल्या
श्रावणाची ही चाहुल निसर्गाला कशी लागली
त्याच्या आगमनाची तयारी त्याने आमच्या नकळत करून घेतली
 
आपली माणसे
आपली माणसे अचानकच आपल्याला सोडून जातात
दूर गेल्यावरच त्यांची किंमत आपणास जाणवून देतात
आपली माणसे जवळ असतांना आपण त्यांची ओळख विसरतो
तीच दूर गेल्यावर त्यांच्या आठवणित झुरतो
अशी ही जिव्ह्याल्याची माणसे सदैव आपण जपून ठेवावी
ती दूर जावू नये ह्याची काळजी घ्यावी आणि
ती दूर गेल्यावर त्यांच्या आठवणीची ठेव आपल्या हृदयात ठेवावी
 

चाहूल
पावलांची चाहूल लागली आणि मनाने झोके घेणे सुरु केले
पावले घरात आली आणि मन भरून आले
मनाचा एकांत सम्पून सहवासने जागा केली
सोबत येणार या सुखांची मानाने यादी केली
क्षणिक असलेल्या ह्या नात्याची मानाने तयारी केली
परत येणार्या एकान्ताची मनाला जाणीव झाली
वेळ थाम्बावी अशी मानाने विनावणी केली
कालाने ती ऐकावी अशी त्याला ही इच्छा होती
दोघांच्या सानिध्यात रात्र ही साथ देत होती
संथ पाण्यावर होडी पण हेल्कावे खात होती
चंद्राच्या साक्षीने दोघानी शपथ घेतली
त्यांच्या ह्या शपथेने पाखरे ही घरट्यात शांततेने झोपली


दीपावली
दीप घेवुनी आली दीपावली
रांगो ळी चे रंग उधलूनी आली दिपावली
लाडू चिवडा चकल्या आणि करंज्या
चिमुकल्यांच्या सुट्ट्या घेवुनी आली दीपावली
नविन कपडे नविन खरेदी अणि
नविन नाती घेवुनी आली दीपावली
पणत्यांच्या रोशनाईने सजली आळी
फटाक्यांच्या स्वरात रंगली दिपावली
अशीच सूखे दिपावली दर वर्षी घेवुनी येते
आपली सर्वांची हृदये दीप उजळवून नेते


मन
 
कसे सांगावे हे समजत नाही
कसे समजावे हे कळत नाही
इतके कसे काय शब्द अपुरे पडू लागले ?
इतके कसे काय मन हळवे झाले ?
मनातले काहुर कधी दूर होणार ?
मनातले कधी तरी काय कोणी ओळखणार ?
मनातले ओळखायला मनासारखेच व्हावे लागते
शरीरात मन जसे आहे एकरूप व्हावे लागते !
 
लहानपण
लहान मुलांशी खेळताना आपणही लहान होवून जावे
त्यातच आपले मोठेपण विसरून जावे !
हसावे, खेलावे, बागडावे, नाचावे, कधी तरी असे करुन पहावे! 
खरच का लहान मुलांना खेळताना खेळणी लागतात ?
की नुसते आई बाबा असले तरी डाव तेवढेच रंगतात?
मग का आई वडिल मुलांना खेळणी देतात?
ती दिली की काय त्यांचा भाग संपतो ?
लहान होणे किती सोपे आहे नाही का?
खरच...
काहीही नसले तरी चालेल असे झाले की लहान नाही का झाले ?
 
समाधान
किती जरी शोधले तरी जे सापडत नाही असे काय ?
किती ही पैसा कमावला तरी जे मिळत नाही असे काय?
सर्व सुख सोयी असुनही काही तरी कमी आहे असे वाटते ते काय ?
किती ही दुखः झाले तरी स्वप्नांच्या मागे धावायला लावते ते काय?
जरी फार सोपे असले तरी मिळवणे सर्वात कठीण असते ते काय?


तान्हुला
तान्हुल्याच्या येण्याच्या चाहुलीने मन आकाशी उडू लागले
तान्हुल्याची वाट पाहतांना मन पालवीत झाले
नविन पाहुणा घरी येणार त्याचीच स्वप्ने मन रंगवू लागले
तो कसा असेल ह्या विचारांभोवती मन भिरभिरवू लागले
अनेक नाती एका सुखद बातमीने बदलू लागली
आई बाबा, आजी आजोबा, काका काकू अशी नाती तयार होवू लागली
एक एक दिवस, एक एक क्षण येणाऱ्या कोमल स्पर्शाची जाणीव देवू लागले
 
लिहीत जावे
लिहीत जावे लिहीत जावे
लिहिता लिहिता सहज सुचावे
सहज सुचावे गीत सुरीले
वाद्यामधुन सूर निघावे
नाद मृदंगाचे ब्रह्म नांदवे
लिहीत जावे लिहीत जावे !
का लिहावे, कसे लिहावे, कुठे लिहावे
विचार करताच विचार खुंटावे
सहज सुचते ते गीत म्हणावे
गुणगुणतही स्मरत राहावे
लिहीत जावे लिहीत जावे !